Thursday, May 27, 2010

परमार्थाची खरी खूण कोणती ?

परमार्थ अंतरंगाचा असतो .बहिरंगाचा नसतो .बाहेरून कितीही साधनेचा दंभ केला तरी अंतरंगात परमार्थाची आवड असेलच असे नाही .तेथे अंतरनिष्ठा असावी लागते .परमार्थात जे ध्येय आपण ठेवतो तेथे आपले अंतरंग तादात्म्य पावते .नाहीतर परमार्थ लटका पडतो .
अंतर्निष्ठा कशी निर्माण करावी याचे उत्तर देताना समर्थ म्हणतात :
लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही जाला मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी -१०-
एखाद्याने व्यवहारात उत्तम लौकिक मिळवला पण अंतर्यामी स्वरूपाकडे क्ष दिले नाही तर मुख्य देव प्राप्त होत
त्याला समर्थ म्हणतात .देवाची केली तर साधक देवलोकाला प्राप्त होतो .निर्गुणाची उपासना केली तर तो निर्गुण बनतो .तेव्हा श्रोते प्रश्न विचारतात :
निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य अनन्य होता होइजे धन्य निश्चयेसी -१०-१२
निर्गुणाचे भजन किंवा उपासना कशी करावी याचे उत्तर देताना समर्थ म्हणतात की निर्गुणाशी अनन्य
व्हावे .मीपणा बाजूला सारावा .व मी कोण याचा विचार करावा .समर्थ सांगतात :
देव पाहता निराकार आपला तो माईक विचार सोहं आत्मा हा निर्धार बाणों गेला -१०-१४
देव निर्गुण निराकार आहे .मीपणा खरा नाही .अशा विचाराने मी तोच आहे ,मी आत्मा आहे हा निर्धार अंगी बाणतो.मी आत्मा आहे असा साक्षात्कार होतो .तो सिध्द बनतो .त्याला साधनाचे बंधन नसते .तो आत्मस्वरूप झाल्यावर त्याला साधनाचे बंधन नसते .त्याची साधकावस्था संपते .मग तो स्वस्वरूपाचा मायेचा शोध
घेतो .आपली अहंता ,माया खोटी आणि परमात्मा खरा असा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो .
साधनाने आपल्याला काय साधायाचे आहे हे ध्येय निश्चित ठरवावे लागते .देहाचा विचार केला तर देह पंचमहाभूतांचा असतो व जीवाचा विचार केला तर जीव असतो ब्रह्माचा अंश !विचाराने तत्वांचा निरास करता येतो व फक्त निर्भेळ आत्मस्वरूप अनुभवास येते .
ज्ञाता वेगळेपणाने ज्ञेयाचे ज्ञान करून घेतो तोपर्यंत ते ज्ञान वृत्तीरूप असते ,कारण त्या ज्ञेयाची प्रतिमा ज्ञात्याच्या मनात तयार होते .त्या प्रतिमेत कल्पना असते ,पूर्वानुभव असतो ,भावनेचा ओलावा असतो ,बुध्दीचा अंश
असतो .ही स्थल कालाच्या मर्यादेत असते .अशा अनेक प्रतिमा तयार होतात .त्यांना वृत्ती म्हणतात .आपल्या मी मध्ये अशा अनेक वृत्तींचा समूह असतो .
मी लयाला गेला की वृत्ती लयाला जातात .
देह्बुध्दीचे ज्ञान वृत्तीरूपात असते .त्या वृत्ती कल्पनेने भरलेल्या असतात .कल्पनेने जे दृश्य निर्माण होते ते खोटे असते .ते खोटे ठरले ,दृश्य लय पावले की शुध्द निर्गुण स्वस्वरूप उरते .विवेकाने ते स्वस्वरूप म्हणजे आपण
स्वत : आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो .हीच परमार्थाची खूण आहे .

Thursday, May 20, 2010

ब्रह्म आणि ब्रह्मांडाचा परस्पर संबंध काय ?

श्रोता म्हणतो :ब्रह्माचे निवारण करता येत नाही .बाजूला सारता येत नाही ,मोड़ता येत नाही ,ब्रह्माला भोक पाड़ता येत नाही .ब्रह्म मागे कलता येत नाही .ब्रह्म अखंड आहे .त्याचे तुकडे करता येत नाहीत .असे असताना ब्रह्मात ब्रह्मांड कसे शिरले ?पर्वत ,पाषाण ,शिळा ,शिखरे नाना प्रकारची स्थाने ,ही रचना कशी निर्माण झाली ?
भूगोळ आहे ब्रह्मामध्ये ब्रह्म आहे भूगोळामध्ये पाहता येक येकामध्ये प्रत्यक्ष दिसे --
ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता --
ब्रह्मी ब्रह्मांड भेदिले हे पाहता नीटची आले परी ब्रह्मांस ब्रह्मांड स्वभावे हे विपरीत दिसे --
भेदिले नाही म्हणावेतरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावेहे सकळांस अनुभवेदिसत आहे । । -- । ।
तरी हे आतां कैसे जालेविचारून पाहिजे बोलिलेऐसे श्रोते क्षेपिलेक्षेपवचन । । -- । ।
पृथ्वी ब्रह्मात आहे ,ब्रह्म पृथ्वी मध्ये आहे .पृथ्वी ब्रह्म एकमेकात आहे असे प्रत्यक्ष आढळते .ब्रह्मात प्रुथ्वीने जागा व्यापली आहे आणि पृथ्वीने अंतर्यामी ब्रह्म आहे .ब्रह्मांड स्थूल ,जड़ आहे .त्याने ब्रह्माचा भेद करून जागा व्यापावी हे विपरीत वाटते असे श्रोते म्हणतात .ब्रह्मांडाने ब्रह्माचा भेद केला नाही असे म्हणावे तर ब्रह्मात ते आहे .मग हे घडले कसे असा श्रोत्यांचा प्रश्न आहे .
समर्थ उत्तर देतात :आपला दृष्टीकोन अतिशय संकुचित असतो त्यामुळे वस्तू जशी आहे तशी आपल्याला दिसत नाही .जर आकाशात दिवा लावला तर दिव्याने आकाश बाजूला साराले जात नाही ..पाणी अग्नी वायू यापैकी एकही भूत आकाशाला बाजूला सारू शकत नाही .आकाश मात्र सर्वत्र स्थिरपणे दाटपणे सगळीकडे भरलेले
असते .ते स्थिर आहे .त्यात हालचाल होत नाही म्हणून त्याला बाजूला सारता येत नाही .पृथ्वी कठीण
आहे ,आकाश सूक्ष्म आहे .मृदु ,बारीक आहे .त्यामुळे ते पृथ्वीच्या अणू ,परमाणूमध्ये आहे .आकाशाशिवाय एकही दुसरे भूत आकाशाचा भेद करू शकत नाही .
मग प्रश्न असा येतो की आकाश ब्रह्म एकच आहेत का ?पण आकाश आणि ब्रह्म यातील भेद समर्थांनी सांगितला आहे :
आकाशाला आपण वेगळेपणाने पाहू शकतो ,म्हणून ते महाभूत !सर्वव्यापीपणा ,सूक्ष्मपणा ,निश्चळपणा घनदाट पणा हे सर्व ब्रह्माचे गुण आकाशात आहेत पण आपण आकाशाला वेगळे पणाने पाहू शकतो म्हणून ते दृश्यात
मोडते . वेगळे पणाने पाहण्याने द्वैत निर्माण होते .त्याला वेगळेपणाने पाहणारा मी देहबुध्दी चा आकुंचितपणा सोडत नाही .आकाशा कडे पाहताना निर्गुण ब्रह्माची कल्पना येते .पण ब्रह्म निर्विकल्प ,अतींद्रिय आहे .
परब्रह्माच्या स्वरूपाचे अज्ञान असल्याने भ्रम होतो .भ्रम देह्बुध्दीचा आकुंचित पणा असतो .भ्रमाने जे दिसते ते खरे काहीच नसते असा अनुभव येतो .जे नाहीच नाही ,ज्याला अस्तित्व नाही ,असे म्हटले तर चुकीचे होणार
नाही .कारण जेव्हा आपण आपली वृती विशाल करतो ,तर वृतीची मर्यादा संपते ,आणि मग परब्रह्मात विलीन
होते ,मुळचे निर्गुण आत्मस्वरूप प्रत्ययास येते ,तेव्हा ब्रह्मांड जे झालेच नाही ते ब्रह्माला भेदण्याचा प्रश्न येत
नाही .

Thursday, May 13, 2010

जन्म कैसा बध्दाते?

ज्ञाता आत्मज्ञान मिळाल्याने सुटतो .बध्दाला जन्म येतो असे समर्थांनी सांगितल्यावर श्रोता विचारतो :
ज्ञाता सुटला ज्ञानमतेपरंतु जन्म कैसा बध्दातेबध्दाचे काय जन्मतेअंतकाळी । । - - । ।
ज्ञानी आत्मज्ञानाने जन्माच्या तावडीतून सुटतो .पण अज्ञानी ,बध्द माणसाला जन्म कसा येतो ? बध्द माणूस गेल्यावर त्याचे काय उरते ?
बध्द प्राणी मरतो तेव्हा त्याचे काही म्हणजे जाणीव सुध्दा उरत नाही .मग तो पुन्हा जन्माला कसा येतो ?
या शंकेला समर्थ उत्तर देतात :
पंचप्राण स्थळे सोडितीप्राणरूप वासना वृत्तीवासना मिश्रित प्राण जातीदेह सोडूनिया । । - - । ।
वायोसरिसी वासना गेलीते वायोरूपेचि राहिलीपुन्हा जन्म घेउनि आलीहेतुपरत्वे। । - - । ।
पांचही प्राण शरीरातील आपली स्थाने सोडतात .त्यावेळी वासना त्यांच्या मागोमाग जाते .कारण वासना प्राणरूप आहे .सूक्ष्म देहाचे प्राण ,मन ,बुध्दी ,अहंकार हे घटक असतात .म्हणून माणसाचा सूक्ष्म देह वासनारूप
असतो .वासना वायूरूप असते .ती असते पण दिसत नाही .स्थूल देह सुटला तरी वासना शिल्लक असते .ती पुन्हा जन्म घ्यायला लावते .मारताना जसा हेतू असेल त्याप्रमाणे ती पुन्हा जन्म घेउन येते .
फूंकल्यासरिसा वायो गेलातेथे वायोसूत निर्माण जालाम्हणो वायोरूप वासनेलाजन्म आहे। । - -११ । ।
मनाच्या वृती नानात्यात जन्म घेते वासनावासना पाहता दिसेनापरंतु आहे । । - -१२ । ।
मुळात वायू स्तब्ध्द असतो .तो फुंकला की त्यात हालचाल होते .हालचालीने प्राण निर्माण होतो .प्राण वासनारूप असतो .वासना जन्म घ्यायला लावते .वासना अत्यंत सूक्ष्म असल्याने आपल्याला दिसत नाही .आपल्या मनातल्या अनेक वृत्तींचे मूळ वासनेत असते .वासनेतून वृत्ती आणि वृत्तीतून वासना असे चक्र चालू राहते .आणि बध्दाला जन्म येतो .

Wednesday, May 12, 2010

आधी स्थूळ की सूक्ष्म?

आधी स्थूळ की सूक्ष्म असा प्रश्न निर्माण होतो .प्रत्येक वस्तू चे बाहेरून दिसणारे अंग म्हणजे स्थूळ आणि वस्तूचे अंतरंग म्हणजे सूक्ष्म अंग .आपला बाहेरून दिसणारा देह म्हणजे स्थूळ देह आणि आपले
अंत :करण ,मन ,बुध्दी ,चित्त अहंकार म्हणजे आपला सूक्ष्म देह !म्हणून श्रोते विचारतात :
आधी स्थूळ आहे येक । तरी मग अंत :करणपंचक जाणतेपणाचाविवेक स्थूळाकरिता - - । ।
तैसेची ब्रह्मांडावीण काहीमूळमायेसी जाणीव नाहीस्थूळाच्या आधारे सर्व हीकार्य चाले । । - - । ।
ते स्थूळचि स्ता निर्माणकोठे राहील अंत:करणऐसा श्रोती केला प्रश्नयाचे उत्तर ऐका। । - - । ।
आधी स्थू पिंड असतो .मग त्यात अंत :करण ,मन ,बुध्दी ,चित,अहंकार असे अंत :करण पंचक असते .स्थूळ निर्माण झालेच नसते तर जाणीव अंत :करण कोठे राहिले असते असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला .त्याला उत्तर देताना समर्थांनी व्यवहारातील उदाहरणे दिली आहेत .रेशमाचा किडा स्वत :भोवती तंतूंचे कोष तयार करतो .दुसरे किडे काट्यांचे कवच करून घर तयार करतात .मग आधी घरे का आधी किडे असा प्रश्न येतो .किडा आधी जन्माला येतो आणि मग घर तयार करतो असा आपल्याला अनुभव येतो .म्हणजेच आधी सूक्ष्म आणि मग स्थूळ निर्माण होते .आधी स्थूळ की सूक्ष्म या प्रश्नावरून अनेक प्रश्न श्रोत्यांनी विचारले आहेत .
जीवाला जन्माला कोण घालतो ?मेल्यानंतर कोण जन्माला येतो ?याचा प्रत्यक्ष अनुभव कसा घेता येतो ?
याचे उत्तर समर्थ देतात :
ब्रह्म जन्मास घालतोविष्णू प्रतिपाळ करितोरूद्र अवघे संहारितोऐसे बोलती । । - -१० । ।
सामान्य लोक म्हणतात की ब्रह्मदेव जन्माला घालतो ,विष्णू सांभाळ करतो ,रूद्र संहार करतो .पण याचा अनुभव येत नाही .श्रोते पुढे विचारतात ब्रह्मदेवाला कोण जन्माला घालतो ?विष्णूला कोण सांभाळतो ?महाप्रळयाच्या वेळी रूद्राचा संहार कोण करतो ?या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत .म्हणूनच दृश्य विश्व खरे नाही .तो मायेचा पसारा
आहे . मग या विश्वाचा कर्ता कोण असा विचार केला तर निर्गुण देव विश्वाचा कर्ता होणार नाही कारण तो विकार रहित आहे .त्यामुळे तो विकारी विश्व निर्माण करणार नाही ..माया विश्व निर्माण करते म्हटले तर मायाच विश्वरूपाने विस्तार पावली आहे .ती शेवटपर्यंत टिकत नाही .असे म्हटल्यावर श्रोते विचारतात :
आता जन्मतो तो कोणकैसी त्याची वोळखणआणि संचिताचे लक्षण । तेही निरोपावे । । - -१५ । । जन्माला कोण येतो ?त्याची ओळखण कशी करावी ?संचिताचे लक्षण मला सांगा असे श्रोता विचारतो .पाप पुण्याचे स्वरुप काय ?हे सर्व प्रश्न विचारणारा कोण आहे ?असे अनेक प्रश्न श्रोते विचारतात .त्यावर समर्थ उत्तर देतात :
हे काहीच ये अनुमानाम्हणती जन्म घेती वासनापरी ते पाहता दिसेनाना धारिता ये । । - -१७ । ।
जन्माला येतो तो कोण या बद्दल काहीच सांगता येत नाही .काही लोक म्हणतात की वासना जन्म घेते .पण वासना पाहता येत नाही ,धरता येत नाही .वासना ,कामना ,कल्पना या अंत:करणाच्या वृत्ती आहेत .त्यामुळे समर्थ म्हणतात की कोण कोणाला जन्माला घालतो हे प्रत्यक्ष दिसत नाही .म्हणून जन्माला आलेल्या प्राण्याला जन्म नाही .मग प्रश्न असा येतो की मेल्यानंतर कोणालाच जन्म नाही तर संतसंगतीने काय होते ?ज्या प्रमाणे वाळलेल्या लाकडाला हिरवा कोंब फुट नाही .फळ पडले की पुन्हा झाडाला लागत नाही त्याप्रमाणे शरीर पडले की पुन्हा जन्माला येत नाही .म्हणजे ज्ञानी अज्ञानी सारखेच झाले असा आक्षेप श्रोते घेतात .तेव्हा समर्थ म्हणतात :
वक्ता म्हणे हो ऐकाअवघे पाषांड करू नकाअनुमान असेल तरी विवेकाअवलोकावे । । - -३२ । ।
प्रेत्नविण कार्य जालेजेविल्याविण पोट भरलेज्ञानेविण मुक्त जालेहे तो घडेना । । - -३३ । ।
प्रयात्नाशिवाय कार्य सिध्दीस गेले ,जेवाल्याशिवाय पोट भरले ,आत्मज्ञानावाचून मुक्त झाला असे घडत नाही .एक जेवला की सर्वांचे पोट भरत नाही .ज्याला पोहता येते तो तरतो .ज्याला येत नाही तो बुडतो .त्याचप्रमाणे आत्मज्ञानी असतात ते संसारसागर तरून जातात .ज्याचे बंधन तुटले तोच मुक्त ! जो बंधनापासून मुक्त होतो तोच म्हणतो आता कसले बंधन नाही .समर्थ म्हणतात :
ज्ञाने चुके जन्ममरणसगट बोलणे अप्रमाणवेदशास्त्र आणि पुराणमग कासयासी । । - -४० । ।
आत्मज्ञानाने जन्म मरण चुकते पण सर्व लोक आत्मज्ञानी नसतात .मग बध्दांना जन्ममरणाचा फेरा
असतोच .म्हणून वेद शास्त्र पुराणे यांचा सिध्दांत आहे की ज्याला आत्मज्ञान होते तोच मुक्त होतो ,इतर जन्म मरणाच्या फेर्यात अडकतात.