Monday, November 30, 2009

कल्पनेचे स्वरुप

कल्पनेचे स्वरुप कसे असते ?
द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नासे द्वैताद्वैत भासे कल्पनेसी - -१७
द्वैताचे जोपर्यंत भान असते तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही .ब्रह्माचा अनुभव आला की द्वैत शिल्लक उरत
नाही .द्वैत अद्वैत दोन्ही कल्पनाच !
कल्पनेचे दोन प्रकार आहेत :चांगली वाईट .
चांगली कल्पना :ईश्वरावर श्रध्दा ,निर्भयता ,चांगुलपणा ,यशाची खात्री
वाईट कल्पना : चिंता ,काळजी ,भय ,हीनपणाची भावना ,पुढे काय होईल ही काळजी .
मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात :
स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या १७२
जी कल्पना विषया संबंधी स्फूरण देते तिला अविद्या म्हणतात .जी कल्पना ब्रह्माचे स्फूरण देते तिला सुविद्या म्हणतात .मूळ कल्पना दोन स्वरूपात असली तरी विवेकाने तीच कल्पना स्वस्वरूपात तदाकार होण्यासाठी मदत करते .कल्पनेचे सामर्थ्य खूप मोठे आहे .कल्पना मायेचे निवारण करते ब्रह्माला थारा देऊन ब्रह्माशी तदाकारता साधून देते .कल्पनाच संशय निर्माण करते , संशय नाहीसा करते .
कल्पनाच प्रपंचाचे बंधन निर्माण करते .कल्पनाच प्रपंचाचे बंधन तोडून देह्बुध्दी कडून आत्मबुध्दी कडे
नेते ,समाधान देते .ब्रह्मस्वरूपाशी अनुसंधान कल्पनाच लावते .कल्पनेने द्वैत निर्माण होते म्हणजे मी निर्माण करते .त्यातूनच मी मुक्त आहे किंवा मी बध्द आहे या कल्पना उगम पावतात .
कल्पना अंतरी सबळनस्ते दावी ब्रह्मगोलक्षणा येका ते निर्मलस्वरुप कल्पी । । - -२१ । ।
कल्पना शबल [अशुध्द ] असेल तर देह्बुध्दी ने खरे नसलेले दृश्य दृष्टीस पडते .त्याउलट कल्पना निर्मल केली तर स्वस्वरूप अनुभवास येते .
कल्पना जन्माचे मूळकल्पना भक्तीचे फळकल्पना तेचि केवळमोक्षदाती । । - -२४ । । क्षणाक्षणा वृत्ती बदलवणारी कल्पना असते .एका क्षणाला आपल्याला ती समाधान मिळवून देते तर दस-या क्षणी ती दु: देते .दु : देते कारण आपल्या वासनेची पूर्तता होत नाही .वासना जन्माचे मूळ आहे म्हणजे पर्यायाने कल्पना जन्माचे मूळ आहे .ती कल्पनाच नाहीशी केली म्हणजे कल्पनेचा निरास केला तर ब्रह्म प्राप्ती होते .
श्रवण मनन निदिध्यास यासारख्या साधन मार्गाने गेल्यास आत्मसाक्षत्कार होउन समाधान
होते .आत्मसाक्षत्काराने शुध्द ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो .बुध्दी स्थिर होते .शबल कल्पना नष्ट होते .द्वैताचे
भान चिंतन नष्ट होते .शुध्द अशुध्द कल्पनेची व्याख्या समर्थ करतात :
अद्वैत कल्पी ते शुध्दद्वैत कल्पी ते अशुध्द । । - -३४ । ।
शुध्द कल्पनेचा अर्थअद्वैताचा निश्चितार्थआणि सबळ वेर्थद्वैत कल्पी । । - -३६ । । ज्या कल्पनेने अद्वैतात रमता येते ती शुध्द कल्पना जी कल्पना द्वैतात रमते ती अशुध्द कल्पना .एकच एक ब्रह्म सत्य आहे असा निश्चय होतो तेव्हा ती शुध्द कल्पना .शुध्द कल्पनेने अशुध्द कल्पना नष्ट करता येते .
शुध्द कल्पना ज्याची कल्पना करते ते आपले स्वस्वरूप ! शुध्द कल्पनेने स्वस्वरूपाशी अनुसंधान लागते .ती शुध्द कल्पनेची खूण आहे .


Saturday, November 28, 2009

ब्रह्म आणि माया यातील द्वैताचा निरास


ब्रह्म आणि माया यातील द्वैताचा निरास कसा करायचा ?
ब्रह्म अंतरी प्रकाशे आणी माया प्रत्यक्ष दिसे आता हे द्वैत निरसे कवणे परी हो - -
श्रोता म्हणतो की मागच्या समासात सांगितलेले ब्रह्मस्वरूप पटले.अंतर्यामी शुध्द ब्रह्म प्रकाशते आहे ,इंद्रीयांना माया प्रत्यक्ष दिसते आहे .मग अशा द्वैताचे निरसन कसे करावे ?
समर्थ उत्तर देतात :
सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी - -
जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या सर्व जाणे म्हणोनिया सर्वसाक्षिणी - -
मनच
संकल्प व विकल्प करते .मन ब्रह्माची कल्पना करते तेव्हा तिला संकल्प म्हणतात .मन मायेची कल्पना करते तेव्हा तिला विकल्प म्हणतात .ब्रह्म व माया हे द्वैत ,संकल्प विकल्प हे सुध्दा द्वैतच !ते मन करते .जेव्हा मनाची अवस्था अशी असते की ते ब्रह्म ही जाणते व मायाही जाणते .तेव्हा त्या अवस्थेला तुर्या म्हणतात .
संकल्प विकल्पाची सृष्टी जाली मनाचिये पोटी ते मनचि
मिथ्या शेवटी साक्षि कवणू - - मनातूनच संकल्प विकल्पाची सृष्टी बाहर पडते .पण शेवटी मन मिथ्या ठरते .मन नाहिसे झाल्यावर साक्षिपणाने पहाणारा कोणी रहात नाही .ज्याप्रमाणे आकाश एकच खरे आहे पण त्याचे घटाकाश ,मठाकाश,महादाकाश असे भेद केले जातात त्याप्रमाणे शुध्द ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेच गुण नसले तरी त्याच्यावर साक्षिपणा चैतन्य ,सत्ता हे गुण ब्रह्माच्या माथी मारले जातात .
माया आपण खरी मानतो म्हणून ब्रह्मावर हे गुण आपण लादतो .पण माया ,अविद्या यांचा निरास झाला की द्वैत नाहीसे होते .साक्षित्व विलीन पावते .मन व्यापक बनता बनता सर्वसाक्षि बनते .द्वैत नाहीसे होते .तेव्हा मन उन्मन होते तुर्या नाहीशी होते .मी सर्व जाणतो हे ज्ञान ही नाहिसे होते .
येवं द्वैत आणि अद्वैत होये वृत्तीचा संकेत वृत्ती जालिया निवृत्त द्वैत कैंचे - -१३
वृत्तीरहित जे ज्ञानतेचि पूर्ण समाधानजेथे तुटे अनुसंधानमाया ब्रह्मीचे । । - -१४ । ।
जेव्हा द्वैत अद्वैत असा भेद प्रतित होतो तेव्हा वृत्ती असते .वृत्ती नाहिशी झाल्यावर द्वैत उरत नाही .तेव्हा मन दृश्यातून बाहेर पडून परमश्रेष्ठ ब्रह्मात विलीन होते .जेव्हा ज्ञानात वृत्तीला स्थान नसते तेव्हा ते ज्ञान खरे ब्रह्मज्ञान असते .ब्रह्मज्ञान झाले की माया ब्रह्माचे चिंतन संपते .
सदा स्वरूपानुसंधानकरी द्वैताचे निर्शनअद्वय निश्चयाचे ज्ञानतेचि शुध्द कल्पना । । - -३४ । । जेव्हा स्वस्वरूपाचे अनुसंधान राखले जाते ,स्वस्वरूपात मन लीन होते तेव्हा माया ब्रह्माचे द्वैत संपते .
अद्वैत कल्पना प्रकाशेतेचि क्षणी द्वैत नासेद्वैता सरिसी निरसेसबळ कल्पना । । - -३७ । ।
अद्वैत कल्पना जेव्हा उगम पावते त्या क्षणी द्वैत नाहिसे होते .त्याच वेळेस सबळ कल्पना म्हणजे अशुध्द कल्पना नाहिशा होतात .
आता असो हे बोलणे जालेआशंका फेडू येका बोले
जयास द्वैत भासलेते तू नव्हेसी सर्वथा । । - -४३ । ।
ज्या कल्पनारूप मनाला द्वैतमय दृश्य स्वरुप अनुभवास येते ते मन तुझे खरे स्वरुप नाही .खरा तू त्या पलिकडे आहेस .

Thursday, November 26, 2009

ब्रह्म नक्की कसे आहे ?या पोस्ट वरील टिप्पणी वर उत्तर

ब्रह्म नक्की कसे आहे या पोस्ट वर आलेल्या टिप्पणी वर उत्तर देताना काय द्यावं याचा विचार करत होते .विचार करता करता मला गाढ झोप लागली .झोपेत एकदम सर्व खोली प्रकाशाने प्रकाशित झाली .प्रकाश इतका प्रखर होता की डोळे उघडत नव्हते .पण प्रकाश जाणवत होता .तेव्हड्यात आवाज आला , '' मुली ,माझ्या स्वरूपाचा विचार करते आहेस ?अग ,जे देवादिकांना ज्ञात नाही ते तुम्हा पामरांना कसे समजणार ?तरी मी तुला सांगतो .बघ,तू डोळे मिटले आहेस .तरीही तुला प्रकाश दिसतो आहे कशाने ?अग मीच तुझ्या डोळ्यांमध्ये आहे माझ्याच शक्ती ने तू पाहू
शकतेस .आता तू झोपली आहेस ,झोपेत इँद्रियांची कार्य थांबलेली असतात .पण तरीही तू ऐकते आहेस का माहीत आहे ?कारण मीच त्याच्या मागे शक्ती देतो आहे .मीच तुझ्या कर्मेँद्रियांना ,ज्ञानेंद्रियांना काम करण्याची शक्ती मीच
देतो . ज्ञान करून घेण्यासाठी मीच उद्युक्त करतो .तुझ्या मनावरही माझाच ताबा आहे ,तसेच बुध्द्दीवरही .मीच तुला सर्व गोष्टी करायला लावतो आहे .बघ ,आहे ना मी तुला व्यापून ?अग ,तू आता जिवंत आहेस कारण माझाच अंश तुझ्यामध्ये आहे .तुझ्या आतमध्ये असलेला माझा अंश म्हणजे अंतरात्मा !
जसा मी तुला व्यापून आहे ,तू माझ्यात आहेस तसा मी या दृश्य विश्वाला व्यापून आहे .त्यातील सर्व चराचरांना व्यापून आहे .हे सर्व चराचर ,दृश्य विश्व ,त्यातील प्रत्येक सजीव निर्जीव या सर्वांना मी व्यापून आहे .पशु ,पंछी,वनस्पती याना पोट भरण्यासाठी ,स्वत :चा जीव वाचवीण्या साठी ज्या प्रेरणा आहेत त्या सर्व माझ्या मुळे आहेत .अनेक पंछी हिवाळ्यात अनेक किलोमीटर प्रवास करून उबदार प्रदेशात स्थलांतर करतात .लाजालू चे झाडाची पाने स्पर्श केला की मिटतात.ही उदाहरणे सांगतात की मीच या सर्व विश्वाला व्यापून आहे .त्यालाच विश्वात्मा म्हणतात .
तुला वाटेल मी फक्त सजीवांना व्यापून आहे .पण तसे नाही .निर्जीवांनाही मी व्यापून आहे .अगदी दगडात सुध्द्दा ! दगडातील अति सूक्ष्म कण अणू ,त्यांच्या मध्ये असलेल्या आकर्षण प्रतिकर्षण बलाने ते एकमेकांना चिकटलेले असतात ,मग विशिष्ट आकारही तयार होतात .अनेक धातू ,अधातु ज्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या सुख सोईं साठी उपयोग करून घेता त्यामध्ये असलेले विशिष्ठ गुणधर्म ही मीच दिलेले आहेत .ते दिले मूळमाये तर्फे .माझ्यात पहिले स्फुरण 'एको हं बहुस्याम 'म्हणजे मूळमाया .मूळमायेतून गुणमाया निर्माण झाली .गुणमायेतून
सत्व ,रज ,तम हे तीन गुण निर्माण झाले .तमोगुणा पासून पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते त्रिगुण यापासून प्रकृती निर्माण झाली .दृश्य विश्व निर्माण झाले .पण माझ्यात ह्या त्रिगुणांचे वास्तव्य नाही .मी गुणातीत आहे .मी निर्गुण आहे .
मला आकार नाही .बघ .२१ स्वर्ग सप्त पाताळ यांच्या पासून एक ब्रह्मगोल तयार होतो .या ब्रह्मगोलाची ,त्याच्या आकाराची तू कल्पना करू शकशील ?असे अनंत ब्रह्मगोल माझ्यात आहेत .मग माझा आकार कसा असेल ?मी निराकार आहे .
दासबोधात समर्थ रामदासांनी सांगितले आहे ना की हे दृश्य विश्व माझ्या एका अंशात्मक भागावर आहे .ते अगदी खरे आहे .समर्थ रामदास मला जाणणारे होते .ज्ञानी होते .त्यावरून तुला कल्पना येइल माझ्या अनंतपणाची! या अनंतपणातही मी घनदाट पणे भरून आहे .अशी एकही जागा नाही जिथे मी नाही .सर्वत्र मी भरून आहे .
ज्याप्रमाणे पाण्याला आकार नसतो ,आपण ठेवू त्या भांडयाचा आकार पाण्याला आल्या सारखा वाटतो ,त्याप्रमाणे मी ज्या ज्या इंद्रियाकडून काम करवून घेतो त्या त्या इंद्रिया मी आहे असा भास होतो ,पण माझ्यात इंद्रिये नसतात .मी इंद्रियातीत आहे .
मी अतिशय सूक्ष्म अत्यंत विशाल आहे .ज्याप्रमाणे साखरेची गोडी साखरेच्या सूक्ष्म कणातही असते अतिशय मोठ्या साखरेच्या गोणीतही असलेल्या साखरेतही असते . त्याप्रमाणे मी सूक्ष्म कणात ही असतो अति विशाल ब्रह्म गोलांनाही व्यापून असतो .
मुंडक उपनिषदात माझे वर्णन आले आहे :
दूरात सुदूरे तद इह अंतिकेच
पशत्सु इहैव निहितं
मी दूराहून दूर अगदी जवळ आहे समीप आहे .मला कोणी पहाण्याचा प्रयत्न करत नाही .तू जेव्हा घरी एकटी असतेस तेव्हा टी .व्ही,रेडिओ लावता अशी कल्पना कर की मी तुझ्या बरोबर आहे ,मी तुझ्या अगदी सन्निध आहे .असा जर अभ्यास चालू ठेवलास तर एक दिवस तुला नक्की जाणवेल की मी तुझ्या जवळ आहे .प्रयत्न तर करून पहा !
माझे केवळ निर्गुण रूपच नाही तर सगुण रूपही आहे .प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण ही माझी सगुण रूपेच आहेत त्यांची भक्ती करूनही भक्तांना माझ्या पर्यंत पोहोचता येते .