Thursday, November 27, 2008

श्रीराम जयराम जय जय राम





। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।

भक्ती मार्ग


भक्ती मार्ग
ईश्वरचरणापर्यंत जाण्यासाठी जीवाला जी वाटचाल करावी लागते तो भक्तीपंथ. मनुष्याचा आत्मज्ञाना पर्यंत जाण्याचा जो मार्ग तो भक्तीपंथ .मी पणाने पाहणारा जाणणारा द्रष्टा तू पणाने असणारे दृश्य यात जेव्हा द्रष्टा दृश्यात विलीन होतो तो भक्तिमार्ग . जे जे अनुभवात शिरते त्या सगळ्यात भगवंत पाहता पाहता तो स्वत : दिसू लागतो तो भक्ती मार्ग ! दशक समास मध्ये समर्थ म्हणतात -
काया वाचा आणि मनेपत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पूनिया मनेसार्थक करावे । । - -३७ । ।
यथानुशक्ती दानपुण्यपरी भगवंती अनन्य सुखदु:खे परी चिंतनदेवाचेचि करावे । । - -३८ । ।
आदि
अन्ती येक देवमध्येचि लाविली माव म्हणोनिया पूर्ण भावभगवंती असावा । । - -३९ । ।
कायेने भगवंताची सेवा करायची ,देउळ स्वच्छ ठेवायचे .देह हे देउळच! त्या देहाची केवळ बाह्य स्वच्छता ठेवायची नाही तर मन स्वच्छ ,शुद्ध ठेवायचे . कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात येत असतील तर ते बाजूला सारायचे .मनात फक्त भगवंत आठवायचा ,भगवंताचे चिंतन करायचे ,रामचि कर्ता असा विचार करून शरीराने विहित कर्म करायचे पण कर्तेपणाचा अभिमान धरायचा नाही ,वाचेने केवळ भगवंताचे नाम घ्यायचे ,त्याच्या नामाचा घोष करीत त्यात रंगून जायचे म्हणजे काया वाचा मनाने भगवंताला अर्पण व्हायचे . पत्रे पुष्पे फळे जीवने यातही लक्षणार्थ आहे .पत्र म्हणजे कमल पत्र .पले जीवन कमलपत्रा प्रमाणे असावे म्हणजे प्रपंचात असून अलिप्त असावे .पुष्प म्हणजे आपल्या जीवनाचे पुष्प ,ते भगवंताला अर्पण करावे .म्हणजे जीवनात केलेली कर्म मी करत नाही ,तर भगवंत माझ्या कडून करवून घेतो आहे असे मानणे .भगवंत कर्म करवून घेणार ,तोच फळ देणार ,तोच भोगणार असा भाव धरणे. तोय म्हणजे जीवन म्हणजे भक्तीचे पाणी ते सुध्दा निर्मळ ते भगवंताला द्यायचे .संस्कृति राजाचा पुत्र रतिदेव उपवासाने इतका कृष झाला होता की त्याला उठण्याचे सामर्थ्य नव्हते .घोटभर पाणी त्याला पिण्यासाठी आणले ,परमेश्वर त्याच्या पुढे अन्त्यज रूपाने आला आणि त्याने पाणी मागितले .रतिदेवाने ते दिले .परमेश्वर त्याला प्रसन्न झाला .त्याची काया तेज :पुंज झाली . पदार्थ कोणताही ,कितीही दिला तरी तो देण्यामागचा भाव महत्वाचा असतो .भाव जितका विशुद्ध तितका परमेश्वर लवकर पावतो .भाव म्हणजे त्याच्या अस्तित्वाविषयी संशय नसला पाहीजे .एक भगवंत सत्य आहे असा द्रुढ निश्चय हवा ,त्यातून भक्ती जन्म घेते .त्यातून भगवंताची अखंड स्मृती रहाते .त्याने भगवंताचे सानिध्य लाभते , तदाकारता राहते .त्यातून स्थिर आत्मीयता निर्माण होते .त्यातून निर्माण झालेली भक्ती अमृतमय ,रसमय ,अनंत आनंदमय असते .यथानुशक्ती दान करायला समर्थ सांगतात .दान करताना 'मी दान केल' हा भाव ठेवता ते रामचि कर्ता हा भाव ठेवायला सांगतात .या शिवाय ते अनन्य व्हायला सांगतात .अनन्यता कशी असावी हे मुंडक उपनिषदात सांगितले आहे .जसे नद्या सारख्या वहात राहून शेवटी सागराला जावून मिळतात ,तेव्हा त्यांचे नाव रूप त्या सोडून देतात ,तसे माणसाने भगवंताशी अनन्य व्हावे .
अनन्य
कसे व्हावे या विषयी गीतेत ११ व्या अध्यायात ५५ व्या श्लोकात सांगितले आहे .
मत्कर्मकृत्मात्परमो मद्भक्त: संड्गवर्जित : । निर्वै : सर्व भूतेषु : मामेति पांडव । । ११ -५५ । ।
मत्कर्म
कृत - माझ्यासाठी सर्व कर्म अर्पण कर .'मी कर्म करतो असे म्हणू नकोस .
मत्परमो
- ईश्वरपरायण हो .मीच तुझा परम आश्रय आहे परम गती आहे .माझ्या प्राप्ती करीता तत्पर रहा.
मद्भक्त
:-माझा भक्त हो .नवविधा भक्तीचे निष्काम भावाने आचरण कर
संड्ग
वर्जित :- प्रपंचातील ,संसारातील कोणतीही आसक्ती ठेवू नकोस
निर्वैर :- या सर्व गोष्टी करणा-याच्या मनात वैर शिल्लक रहात नाही .
माणूस
साधारणपणे दु:खात् परमेश्वराला आठवतो .त्याला चांगले दिवस असताना ,सुख असताना परमेश्वर आठवत नाही .म्हणून समर्थ सांगतात की सुखातही परमेश्वर आठवा .
जो
भगवद भजनेवीणजावू नेदी एक क्षण सर्व काळ अंत :करणभक्तीरंगी रंगले । । १४ - -२४ । ।
भगवद भजनावीण जो एक क्षण ही जावू देत नाही त्याचे अंत:करण भक्तीरंगात रंगून जाते .मीराबाई हरी भजनात इतक्या रंगून जात की राणाने पठविलेला विषाचा प्याला त्या सहज प्यायल्या.भागवत धर्माचे कळस असलेले तुकाराम महाराज म्हणतात - तुटो हे मस्तक ,तुटो हे शरीरनामाचा गजर सोडू नये नामाचा गजर करायला तुकाराम महाराजांसारख्या सांसारिक संतानी सांगितले आहे .श्री समर्थ सर्व आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे असे म्हणतात .फक्त त्यात स्वधर्माचे आचरण भूतदया करायला सांगतात .
त्याहि
मध्ये अलौकिकतो हा भक्तिमार्ग । । १४ - - । । ज्या गृहस्थाश्रमात अलौकिक असा भक्ती मार्ग आढळतो तो हा गृहस्थाश्रम धन्य आहे असे समर्थ म्हणतात .तो धन्य तेव्हा होतो जेव्हा तेथे शरीराने ,वाणीने , प्राणपणाने भगवंतासाठी कष्ट केले जातात .असा भगवंताचा भक्त आतू विरक्त असतो ,अलिप्त असतो .वृती उदासीन असते .अंतर्यामी स्वानुभवाने विवेक जागृत होतो .त्यामुळे आत्मसाक्षात्कार होतो .त्याच्या दर्शनाने लोकांना समाधानाची प्राप्ती होते असा माणूस ओळखायचा कसा ? -जो उपास्यदेवतेच्या ध्यानात तरी गुंतलेला असतो ,आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात लीन असतो किंवा श्रवण मनन यात गुंतलेला असतो .आशा माणसाला प्रचितीचे ज्ञान असते .असा प्रचितीने युक्त असलेला भक्त कसा असतो ते दशक समास मध्ये समर्थ सांगतात - जो भगवंताचा भक्तजो जन्मापासूनि मुक्त ज्ञानाबले विरक्तसर्व काळ । । - -५२ । ।

Monday, November 17, 2008

भक्ती का करावी ?

भक्ती का करावी ?
समर्थ म्हणतात ,' नरदेहाचे उचित काही करावे आत्महीत
यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे - -१३
नरदेहाचे सर्वोत्तम उद्दिष्ट भगवंताची प्राप्ती करून घेऊन जन्ममृत्युचा फेरा चुकवणे आहे . म्हणून समर्थ म्हणतात
या नरदेहाची प्राप्ती झाल्यावर काही तरी आत्महीत करावे .भक्ती पंचकात समर्थ म्हणतात - दु:मूळ हा संसार
तयामध्ये भक्ती सार हा संसार दु :मूळ आहे .कोणत्याही भौतिक गोष्टीमुळे मिळालेला आनंद क्षणिक असतो कारण ज्या गोष्टीँमुळे आपण आनंद मिळवतो - गाडी ,घर , व्यवसाय ,मुले,संसार या सर्व गोष्टी नाशवंत आहेत ,
असार आहेत .त्यातून मिलवलेला आनंद शाश्वत नाही.शाश्वत आनंदाच्या प्राप्ती साठी भक्ती सार आहे .
भक्तीने काय साधते हे समर्थ भक्ती पंचकात सांगतात ,उपमन्यूने धावा केल्यावर त्याला क्षीरसागर भगवंतानी
त्याला दिला .ध्रुवाला पद दिले .पोपटाच्या निमित्ताने राघवाचे नाम घेणा-या गणिकेला मुक्त केले .शंकरानी
राम नाम धारण केल्यावर त्यांचा कंठातील दाह थांबला
मानवात त्रिगुण वास करत असतात त्यातला रजोगुण माणसाला जन्ममृत्युच्या फे-यात अड्कवतो .रजोगुण
सुटत नाही तर काय कराव असे शिष्यानी विचारल्यावर समर्थ म्हणतात ,
उपाय एक भगवद भक्ती जरी ठाकेना विरक्ती
तरी यथानुशक्ती भगवद भजन करावे - -३६
विरक्ती जरी आली नाही तरी जमेल तशी भक्ती करायला समर्थ सांगतात .कारण सामान्यातला सामान्य सुध्दा भक्तीमार्गाचा पाईक होऊ शकतो .वेदांताचा अभ्यास करता सुध्दा भक्तीमार्गाची वाटचाल करता येते .एक गोष्ट
आहे.एका खेड्यात एक म्हातारी बाई रहात होती .तिने एका प्रवचनात ऐकले की आपली सर्व कर्म कृष्णार्पण
करावीत .ती प्रत्येक कर्म ,प्रत्येक कृती करताना कृष्णार्पण म्हणू लागली .खाताना,जेवताना ,स्वयंपाक करताना
आंगण सारवताना कृष्णार्पण म्हणू लागली .असे म्हणता म्हणता एक दिवस अंगण सारवताना शेणाचे गोळे
श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून टाकू लागल्यावर त्या गावातील कृष्णाच्या मूर्ती वर येऊन पडू लागले .लोकांना
कळेना हे गोळे कोठून येत आहेत .शोध घेता घेता कळले की म्हातारी गोळे टाकते आहे आणि ते गोळे कृष्ण
मूर्ती वर पडत आहेत .लोकांनी म्हातारीला मारायला सुरुवात केली .श्री कृष्ण भगवान प्रकट झाले .म्हातारीची
जीवनज्योत कृष्ण मूर्तीत विलीन झाली .कर्म ईश्वरार्पण केल्याने साधकाला दु :खे हलकी व्हायला मदत होते ,
यश अपयश पचवायला मदत होते .अति दु : ,अति सुख ,कोणताच अतिरेक होत नाही .
पापी ,दुराचारी माणसालाही उध्दरून नेण्याचे सामर्थ्य भक्तीच्या ठायी आहे .भक्तीयोगाचा अभ्यास सुफलीत झाला
की मिळालेला आनंद स्व:पुरता रहात नाही .संत ,ज्ञानी भक्त आपला अनुभव जगाला वाटतात .त्यामुळेच
दासबोध,ज्ञानेश्वरी ,एकनाथी भागवत यासारखे ग्रंथ निर्माण झाले
भक्ती ज्ञानाचा अंकुश आहे .ज्ञानाचा अंहकार भक्ती नाहीसा करते .दासबोधाचे कर्तेपण समर्थ स्व:कड़े घेत
नाहीत .ते म्हणतात ,
भक्ताचेनि साभिमाने कृपा केली दाशरथीने
समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध २० -१० -३०
श्री रामरायाने भक्ताचा म्हणजे समर्थांचा अभिमान धरला .त्यांच्यावर कृपा केली .समर्थांच्या [श्रीरामांच्या ]
कृपेने वचने स्फूरली.त्या वचनांचा संग्रह म्हणजे दासबोध आहे
आपले विहित कर्म ईश्वरार्पण भावनेने करणारा भक्त देवाला आवडतो .एकदा नारदांनी भगवंताला विचारल ,
भगवंता आपला सर्वात आवडता भक्त कोणता ? भगवंतानी शेत-याचे नाव घेतले .नारदांना आश्च- वाटले.
तो शेतकरी एकदाच तुमचे नाव घेतो ,तो तुमचा आवडता भक्त कसा ?
भगवंतानी नारदाला एक गडू भरून तेल दिले ,पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली .अट घातली की एक थेंब ही पृथ्वी वर पड़ता कामा नये .नारद महाराज निघाले पृथ्वी प्रदक्षिणेला ! संपूर्ण लक्ष होत तेलाकडे ! पृथ्वी प्रदक्षिणा
करून नारद भगवंताकडे .भगवंताने विचारले ,'नारदा ,किती वेळा नाम घेतलस? नारदांकड़े उत्तर नव्हते .भगवान
म्हणाले ,'आता कळले का शेतकरी माझा सर्वश्रेष्ठ भक्त का ?